शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

‘वसंत’च्या कामगारांनी अडविले साखरेचे ट्रक

By admin | Published: November 11, 2015 1:52 AM

थकीत वेतनासाठी आंदोलन करणाऱ्या वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी साखर नेण्यासाठी आलेले ट्रक अडवून आपला रोष व्यक्त केला.

वेतन-बोनस नाही : प्रशासन आणि कामगारांत तणाव वाढला उमरखेड : थकीत वेतनासाठी आंदोलन करणाऱ्या वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी साखर नेण्यासाठी आलेले ट्रक अडवून आपला रोष व्यक्त केला. दिवाळीच्या तोंडावरही कारखाना प्रशासन वेतन देत नसल्याने कामगार चांगलेच संतप्त झाले आहे. यातून कारखाना प्रशासन आणि कामगारात तणाव वाढला आहे.वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना गत १३ महिन्यांपासून पगार मिळाला नाही. वारंवार आंदोलने करूनही प्रशासन उपाययोजना करीत नाही. त्यामुळे ६ नोव्हेंबरपासून कामगारांनी कारखान्याच्या गेटसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. परंतु अध्यक्षांसह संचालक मंडळाने दखल घेतली नाही. त्यातच कारखान्याने विकलेली साखर नेण्यासाठी मंगळवारी आठ ते दहा ट्रक कारखाना परिसरात आले. कामगारांना हा प्रकार माहीत होताच त्यांनी सर्व ट्रक अडविले. एकाही ट्रकला कारखान्याच्या आत प्रवेश करु दिला नाही. काही वेळातच हे सर्व ट्रक परत गेले. विशेष म्हणजे या कारखान्यात एक लाख २२ हजार साखरेच्या गोण्या शिल्लक आहे. त्यातील २५ हजार पोती साखर कारखान्याने विकली आणि तीच साखर नेण्यासाठी मंगळवारी ट्रक आले होते. परंतु कामगारांच्या रौद्ररुपापुढे कुणाचेही काहीच चालले नाही. गळीत हंगाम अद्याप सुरू झाला नाही. त्यातच कामगारांंना १३ महिन्यांपासून पगार नाही. यापूर्वी सतत २८ दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर उमरखेडमध्ये भीक मागो आंदोलनही करण्यात आले. संचालक मंडळाने दोन महिन्याचे वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर तीन महिने झाले तरी एकाही कामगाराचा पगार दिला नाही. या दरम्यान अनेकदा निवेदने दिली. परंतु उपयोग झाला नसल्याने ६ नोव्हेंबरपासून कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले. या उपोषणाला खासदार अ‍ॅड. राजीव सातव, आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर, माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, अ‍ॅड. माधवराव माने, भीमराव पाटील, विलास चव्हाण आदींनी भेट देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कामगारांचा तीव्र रोष कारखाना अध्यक्ष व संचालक मंडळावर दिसून आला. जोपर्यंत वेतन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर ऊस उत्पादक राम देवसरकर, रमेश चव्हाण, डॉ.वि.ना. कदम यांनी कामगारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु कामगार वेतनावरच ठाम आहे. दिवाळी सण आला तरी अद्याप वेतन मिळाले नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. (शहर प्रतिनिधी)