शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

पाणथळ प्रदेशांच्या यादीत महाराष्ट्र 'ढांग'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2022 11:35 AM

२ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा २०२२ या वर्षासाठी ‘वेटलॅन्ड ॲक्शन्स फॉर पीपल ॲन्ड नेचर’ ही मध्यवर्ती संकल्पना ठरविण्यात आली आहे.

ठळक मुद्देआज जागतिक पाणथळ दिवसनऊ निकषांसाठी सात ठिकाणांचे प्रस्ताव प्रलंबित

अविनाश साबापुरे

यवतमाळ : वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणाने पक्ष्यांचा हक्काचा अधिवास असलेल्या पाणथळ ठिकाणांची संख्या कमी होत आहे. जागतिक स्तरावर नोंद असलेल्या अशा प्रदेशांच्या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक सर्वात शेवटी असल्याची माहिती समोर आली आहे. २ फेब्रुवारी रोजी जगभरात साजऱ्या होणाऱ्या पाणथळ दिवसानिमित्त हा आढावा...

नैसर्गिकरित्या खोल भागात पाणी साचून तेथे दलदलीचा प्रदेश तयार होतो. त्यालाच सर्वसाधारणपणे पाणथळी म्हटले जाते. जगात २४३५ पाणथळ प्रदेशाची नोंद या चळवळीने घेतली आहे. त्यातील केवळ ४७ प्रदेश भारतात आहेत. उत्तर प्रदेश व पंजाबमध्ये यातील बहुतांश प्रदेशाची नोंद आहे, तर महाराष्ट्रात केवळ नांदूर मदनेश्वर (जि. नाशिक) आणि लोणार सरोवर (जि. बुलडाणा) या दोनच ठिकाणांचा त्यात समावेश आहे. तसेच नवेगावबांध जि. गोंदिया, ठाणे खाडी, शिवडी, वेंगुर्ला (सावंतवाडी), जायकवाडी, उजनी धरण क्षेत्र, हतनूर धरण क्षेत्र या सात ठिकाणांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.

पाणथळ प्रदेशातील जैवविविधता अन्य प्रदेशांपेक्षा अधिक संपन्न असते. भारतात आजघडीला नोंद असलेल्या १४०० पक्ष्यांच्या प्रजातींपैकी ३५० प्रजातींचे पक्षी हे पाणपक्षी म्हणून ओळखले जातात. या ३५० प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास पाणथळी प्रदेशातच असतो. त्यामुळे अशा प्रदेशांचे संवर्धन करण्याची गरज अमरावती जिल्हा जैवविविधता समितीचे सदस्य प्रा. डॉ. गजानन वाघ यांनी व्यक्त केली.

पाणथळ दिवसाची सुरुवात कशी झाली ?

२ फेब्रुवारी १९७१ रोजी इराणमधील रामसर शहरात ‘पाणथळी आणि संवर्धन’ या विषयावर पहिल्यांदाच जागतिक परिषद पार पडली. तेव्हापासून २ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. यात १७२ देश सहभागी आहेत. हे देश २ फेब्रुवारी रोजी पाणथळ दिवस साजरा करून वर्षभरासाठी अशा प्रदेशांच्या संवर्धनासाठी एखादी थिम निश्चित करतात. यंदा २०२२ या वर्षासाठी ‘वेटलॅन्ड ॲक्शन्स फॉर पीपल ॲन्ड नेचर’ ही मध्यवर्ती संकल्पना ठरविण्यात आली आहे. नऊ निकष तयार करून या परिषदेमार्फत जगातील पाणथळी प्रदेशांना ‘रामसर दर्जा’ दिला जातो.

पाणथळी संवर्धनासाठी मोठ्या चळवळीची गरज आहे. त्यासाठी शासनानेही कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्यात नागरिकांचा, लोकप्रतिनिधींचा, विविध शासकीय, अशासकीय संस्थांचा सहभाग घेतल्यास फायदा होईल.

- प्रा. गजानन वाघ, सदस्य, जिल्हा जैवविविधता समिती, अमरावती

टॅग्स :environmentपर्यावरणSocialसामाजिक