शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

पीकविमा ठरला वरळी मटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:28 AM

महागाव : विमा काढून पीक संरक्षित करणे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे. मात्र, विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना हात आखडता घेतात. ...

महागाव : विमा काढून पीक संरक्षित करणे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे. मात्र, विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना हात आखडता घेतात. त्यामुळे पीकविमा शेतकऱ्यांसाठी मृगजळ झाला असून, वरळी मटका ठरत आहे.

ज्या पिकाचा विमा जादा उतरविण्यात आला, अशा पिकांचे नुकसान झाल्यास पीकविमा मंजूर करताना कंपन्या अनेक किचकट नियम जाणीवपूर्वक घालून भरपाई नाकारतात. उलट ज्या पिकाचा पेरा कमी असतो, अशा पिकाला विमा लाभ मंजूर केला जातो. परिणामी ज्या पिकाचे जादा नुकसान झाले, त्या पिकाला काहीच मिळत नाही. यातून दिवसेंदिवस पीकविमा कंपन्या मालामाल होत आहेत.

आता शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांवरील विश्वास उडत आहे. पीक म्हणजे वरळी मटका ठरत असल्याची प्रतिक्रिया कापूस उत्पादक तथा अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी व्यक्त केली. गेल्या खरीप हंगामात पिकांचे संरक्षण करण्यासाठी उमरखेड विभागातील शेकडो शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. त्यापैकी काही मोजक्याच शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेची मदत मिळाली. उर्वरित शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे यावर्षी शेतकरी विमा उतरविण्याबाबत निरुत्साही दिसून येत आहेत.

बॉक्स

कंपनीचे मोबाईल नॉट रिचेबल

उमरखेड विभागात मागील खरीप हंगामात पीक काढणीवेळी नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. पीक विमा योजनेत शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. विम्याचा हप्ता भरला गेला. त्या तुलनेत अत्यल्प लाभ मिळाला. अपात्र शेतकऱ्यांची संख्या जादा असल्यामुळे आता विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विमा उतरविताना अनेक प्रलोभने दिली जातात. मात्र, नुकसानभरपाई देताना विमा कंपनीचे मोबाईल नॉटरिचेबल असतात.

कोट

विमा कंपन्यांकडे ऑनलाईन किंवा टोल फ्री क्रमांकावर तक्रार करताना अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्या. त्यामुळे जे शेतकरी तक्रार देऊ शकले नाहीत, त्यांना लाभापासून मुकावे लागले. कापूस, सोयाबीन उत्पादक लाभापासून वंचित राहत आहे.

बळीराम राठोड,

शेतकरी, करंजखेड