शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

रिलायन्ससोबतच्या करारामध्ये फसले यवतमाळचे विमानतळ; १४ वर्षांपासून ठप्प

By विशाल सोनटक्के | Published: February 23, 2023 11:38 AM

हवाई सेवेला सरकारच्या उदासीनतेचे ग्रहण

यवतमाळ : विमानतळांच्या आधुनिकीकरण देखभाल दुरुस्तीसाठी करार झाल्यानंतर सहाजिकच दर्जेदार विमानसेवा उपलब्ध होईल, अशी यवतमाळकरांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात घडले उलटेच. रिलायन्ससोबत करार केल्यापासून यवतमाळच्या विमानतळाचे कामकाज ठप्प झाले. कहर म्हणजे, करार केल्यानंतर रिलायन्सने ठरल्याप्रमाणे एकही काम केले नाही. मात्र तरीही मागील २४ वर्षांपासून राज्य शासनाला हा करार संपुष्टात आणण्याचे धाडस दाखवता आलेले नाही. पर्यायाने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या अडीचशे एकरवरील या विमानतळाला आज माळरानाचे स्वरूप आले आहे. रिलायन्ससोबत करार झालेल्या राज्यातील इतर विमानतळाची अवस्थाही यवतमाळसारखीच झाली आहे.

सर्वाधिक आणि दर्जेदार कापूस पिकविणारा जिल्हा अशी यवतमाळची ओळख आहे. विमानतळामुळे येथील उद्योग व्यवसायाला गती मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील या अपेक्षेने ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी कठोर परिश्रम घेऊन यवतमाळमध्ये विमानतळ उभारले. या विमानतळामुळेच यवतमाळमध्ये पुढे हजारो हातांना काम देणारा रेमण्डसारखा मोठा प्रकल्प आला.

दरम्यान २००८ मध्ये केंद्र शासनाने उडाण योजनेच्या माध्यमातून छोटी शहरे विमानतळाने जोडण्याची योजना जाहीर केली. या योजनेनुसार विमानतळांचे आधुनिकीकरण, अर्थसहाय्य, विकास व देखभाल तसेच दुरुस्ती आणि व्यवस्थापन या अटी आणि शर्तीनुसार २००९ मध्ये यवतमाळसह राज्यातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद व बारामती या ठिकाणची विमानतळे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाकडे हस्तांतरित केली. सुरुवातीच्या काळात रिलायन्सने या विमानतळावर किरकोळ दुरुस्त्या केल्या. मात्र त्यानंतर पुढील कार्यवाहीकडे साफ दुर्लक्ष केले. पर्यायाने यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा विमानतळावरील हवाई सेवा मागील २४ वर्षांपासून केवळ कागदावरच राहिली आहे. सध्या या विमानतळाची प्रचंड दुरावस्था झाली असून, रिलायन्स कंपनीचे केवळ दोन वॉचमन या अडीचशे एकरावरील विमानतळाची देखभाल करताना दिसतात.

लातूरमध्ये केवळ मंत्र्यांसाठीच हवाई सेवा

२००८ मध्ये लातूर येथे विमानतळाची निर्मिती झाली. या विमानतळावरून नियमित वेळापत्रकानुसार शेवटचे विमान उड्डाण २१ ऑगस्ट २००९ रोजी झाले. त्यानंतर खासगी कंपनीसोबत विमानसेवेचा करार झाला. काही दिवसांनंतर ही सेवा बंद झाली, ती अद्यापही जैसे थे आहे. सध्या मंत्रीमंडळातील महत्त्वाचे व्यक्ती तसेच शासकीय कामानिमित्त येणाऱ्या विमानांची ये-जा सुरू असल्याचे येथील विमानतळाचे व्यवस्थापक राजेश जीवन यांनी सांगितले.

उस्मानाबादमध्ये व्यावसायिक विमानाचे उड्डाणच नाही

उस्मानाबादनजीक खेड येथे १९८४ मध्ये पद्मसिंह पाटील यांच्या पुढाकाराने विमानतळाची उभारणी झाली. मात्र निर्मितीपासून ते आजतागायत येथून एकाही व्यावसायिक विमानाचे उड्डाण झालेले नाही. २००९ मध्ये हे विमानतळही रिलायन्स कंपनीकडे भाडे तत्वावर आहे. कोरोनापूर्वी काही काळ येथे खासगी कंपनीकडून वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होते. मात्र त्यानंतर रन-वे बंद असल्याने या ठिकाणीही आता विमान उतरू शकत नाही.

नांदेडातील विमान सेवाही झाली ठप्प

२००८ मध्ये गुरु-ता गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्ताने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेत समावेश करून शहरासाठी अडीच हजार कोटींचा निधी मिळाला. या निधीतील कोट्यवधी रुपये खर्चून नांदेड विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले. कोरोनापूर्वी या विमानतळावरून मुंबई, हैदराबाद, औरंगाबादसह दिल्ली, चंदीगड, अमृतसर या ठिकाणी विमानसेवा सुरू होती. मात्र एक-एक विमानसेवा बंद होत गेली. आता येथेही नियमित विमानसेवा ठप्प झाली आहे.

टॅग्स :AirportविमानतळYavatmalयवतमाळRelianceरिलायन्स