शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंच्या घरापुढे भोंगे वाजविणार; यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जत्था मुंबईकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2022 6:19 PM

५० शेतकऱ्यांचा जत्था मुंबईला रवाना झाला असून ४ मे रोजी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर राजकीय भोंगे बंद करण्यासाठी महाआरती करणार आहे.

ठळक मुद्देदहा तास वीज देण्याची मागणी

यवतमाळ : राजकीय पक्ष भोंगे वाजविण्यात व्यस्त आहे. जनसामान्यांच्या प्रश्नाकडे त्यांची डोळेझाक झाली आहे. समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम काही नेत्यांनी केले आहे. मात्र, यात सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक होत आहे. या सर्वांची आठवण करून देण्याच्या उद्देशातून जिल्ह्यातील शेतकरी मुंबईला रवाना झाले आहेत. हे शेतकरी मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या घरापुढे भोंगे वाजविणार आहेत.

शेतकरी नेते विनायक पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली होती. १ मेपासून शेतकऱ्यांना दररोज दिवसा १० तास वीज देण्यात यावी, साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे बिल एफआरपीप्रमाणे एक हप्त्यात द्यावे, फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पेन्शन द्यावे, आमदार-खासदारांचे पेन्शन बंद करावे, गायीच्या दुधाला प्रति लीटर ४० रुपये भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी मुंबईत मंत्रालयापुढे आंदोलन करणार आहेत. 

याशिवाय जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे राजकीय नेते यांना देखील आवर घालण्यासाठी त्यांच्या घरापुढे जाऊन शेतकरी भोंगे वाजविणार आहेत. या आंदोलनात वारकरी संघटनेचे नेते सिकंदर शाह, बाळू चव्हाण, बाळू राठोड, बाळू विरुटकार यांच्यासह ५० शेतकऱ्यांचा जत्था मुंबईला रवाना झाला असून ४ मे रोजी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर राजकीय भोंगे बंद करण्यासाठी महाआरती करणार आहे. त्यांच्यासह भजनी मंडळ देखील सोबत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे