शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

माझी वसुंधरा अभियानात यवतमाळ पालिका राज्यात दुसरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 17:52 IST

Yavatmal : नगरपालिकेला मिळाले कोटींचे बक्षीस

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्पर्धा घेण्यात आली. हे अभियान राबविण्यात यवतमाळ नगर परिषद राज्यात दुसऱ्या क्रमांकाची ठरली आहे. यामुळे नगरपालिकेला पाच कोटींचे बक्षीस मिळाले आहे. यासोबतच जिल्ह्याचाही या अभियानात अमरावती विभागात दबदबा असून, पहिला क्रमांक मिळाला.

माझी वसुंधरा अभियान हे १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. १ ते ३ लाख लोकसंख्या असणाऱ्या नगर परिषदेच्या गटात यवतमाळ शहराने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. हे अभियान तत्कालीन मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या काळात राबविण्यात आले होते. यासोबतच वणी व दारव्हा नगर परिषद, मारेगाव आणि बाभूळगाव नगर पंचायतीने अमरावती विभाग स्तरावर गुणांकन प्राप्त केले आहे. अमरावती विभागात जिल्ह्यातील तीन नगर परिषदा आणि दोन नगर पंचायती माझी वसुंधरा अभियानात गुणवत्तेत आल्या आहेत. 

राज्य शासनाने रोख पुरस्काराच्या विनियोगाची कार्यपद्धती निश्चित करून दिली आहे. यामध्ये ढोबळ मानाने बक्षिसाची ५० टक्के रक्कम शहरात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी खर्च करावी लागणार आहे. तर ५० टक्के रक्कम पर्यावरणपूरक इतर उपाययोजनांसाठी वापरावी, इतर उपाययोजनांच्या रकमेतून १० टक्क्यांपर्यंतची रक्कम माझी वसुंधरा अभियानामध्ये शहर स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस देण्यास मान्यता दिली आहे. 

ही कामे करता येणार बक्षिसाच्या रकमेतून जैवविवि- धतेच्या संवर्धनावर, जुन्या हरित क्षेत्राचे संवर्धन देखभाल, रोपवा- टिकांची निर्मिती, जलसंवर्धन उपक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी, तळे व नाल्याचे पुनरुज्जीवन, सौर- ऊर्जेवर चालणारे पथदिवे, विद्युत वाहन, चार्जिंग पॉइंट अशा ठळक बाबींवर ही रक्कम खर्च करता येणार आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ