शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

यवतमाळचा निकाल ९१.९८ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी

By अविनाश साबापुरे | Published: May 25, 2023 3:28 PM

यावर्षी जिल्ह्यातील १४ हजार २७५ विद्यार्थी बारावीत उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९०.१० टक्के आहे.

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल ९१.९८ टक्के इतका लागला असून यंदाही मुलांपेक्षा मुलींनीच पुन्हा एकदा बाजी मारल्याचे स्पष्ट झाले. यंदा जिल्ह्यातून २९ हजार ९०७ नियमित विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी २७ हजार ५०१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. विशेष म्हणजे १५१२ विद्यार्थ्यांनी प्राविण्यश्रेणी मिळविली आहे. तर ८ हजार ५५३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत. १३ हजार २०४ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणीवरच समाधान मानावे लागले. अभ्यासक्रम शाखानिहाय विचार करता यंदा विज्ञान शाखेचा सर्वाधिक म्हणजे ९७.८४ टक्के निकाल आला आहे. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा ९२.२८ टक्के तर कला शाखेचा निकाल केवळ ८६.९१ टक्के इतका लागला आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमातून ८७.५८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

यावर्षी जिल्ह्यातील १४ हजार २७५ विद्यार्थी बारावीत उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९०.१० टक्के आहे. तर १३ हजार ६८५ विद्यार्थिनींनी बारावी निकालात यश मिळविले असून त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९४.०२ इतकी आहे. बारावीच्या निकालाचा तालुकानिहाय विचार करता यंदा महागाव तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९६.०९ टक्के लागला आहे. त्यानंतर नेर तालुक्यानेही बाजी मारत ९५.९३ टक्के विद्यार्थ्यांना यश मिळवून दिले आहे. बाभूळगावमधून ९४.८५ टक्के विद्यार्थी यशस्वी झालेत. आर्णी ९४.२६, उमरखेड ९३.६१, दारव्हा ९३.६०, यवतमाळ ९२.३८, पुसद ९२.२६, कळंब ९२.२१, घाटंजी ९१.६९, दिग्रस ९१.३५, झरी ९०.५६, राळेगाव ९०.५६, मारेगाव ८९.८९, पांढरकवडा ८८.०६, तर वणी तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८०.८७ टक्के लागला आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालHSC / 12th Exam12वी परीक्षा