शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आला; जिल्ह्यात ६० टक्क्यांवर विद्यार्थी अनुत्तीर्ण

By अविनाश साबापुरे | Published: August 28, 2023 1:26 PM

फेरपरीक्षेकडे बहुतांश विद्यार्थी अजूनही गांभीर्याने बघत नसल्याचे वास्तव पुढे आले

अविनाश साबापुरे, यवतमाळ: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल केवळ ३५.७५ टक्के तर बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल केवळ ३७.०३ टक्के आला आहे. त्यामुळे फेरपरीक्षेकडे बहुतांश विद्यार्थी अजूनही गांभीर्याने बघत नसल्याचे वास्तव पुढे आले.

राज्य शिक्षण मंडळामार्फत जुलै महिन्यात या दोन्ही वर्गांच्या फेरपरीक्षा घेण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी-मार्चमधील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळावी म्हणून फेरपरीक्षा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील ७१९ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ६७४ विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्षात परीक्षा दिली. त्यापैकी केवळ २४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे बारावीच्या फेरपरीक्षेसाठी जिल्ह्यातील ५२९ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५१३ जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आणि त्यातून केवळ १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बहुतांश विद्यार्थी तृतीय श्रेणीत

फेरपरीक्षेचा निकाल कमी लागलेला असतानाच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी तृतीय श्रेणीत आले आहेत. दहावीतील एकूण २४१ उत्तीर्णांपैकी तब्बल २३८ विद्यार्थ्यांना तृतीय श्रेणी मिळाली आहे. तर केवळ एकाच विद्यार्थ्याला प्रथम श्रेणी घेता आली. बारावीचीही परिस्थिती तशीच आहे. बारावीतील एकंदर १९० उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १२६ जणांना तृतीय श्रेणीच मिळविता आली. मात्र तीन विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह गुण घेत यश संपादन केले आहे.

टॅग्स :examपरीक्षाYavatmalयवतमाळ