शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Yavatmal: पतीच्या विमा दाव्यावर पहिला हक्क पत्नीचाच, ग्राहक आयोगाचा निर्वाळा

By विलास गावंडे | Updated: March 22, 2024 22:11 IST

Yavatmal News: विमा दावा दाखल करताना प्रस्तावात कुटुंबातील इतर कुठल्याही सदस्यांचा समावेश केलेला नाही, असे कारण देत विमा कंपनीने शेतकरी कुटुंबाला भरपाई नाकारली होती.

यवतमाळ - विमा दावा दाखल करताना प्रस्तावात कुटुंबातील इतर कुठल्याही सदस्यांचा समावेश केलेला नाही, असे कारण देत विमा कंपनीने शेतकरी कुटुंबाला भरपाई नाकारली होती. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने विमा दाव्याची रक्कम देताना पहिला हक्क पत्नीचाच असल्याचे नमूद करत कंपनीने तातडीने भरपाई द्यावी, असा आदेश दिला आहे.

पांढरकवडा तालुक्यातील अकोली खुर्द येथील संदीप चंद्रभान बोरवार यांचा खुनी नदीत बुडून मृत्यू झाला. त्यांची पत्नी मीना संदीप बोरवार यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत लाभासाठी पांढरकवडा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला. या विभागाने दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे हा प्रस्ताव पाठविला; परंतु या कंपनीने विविध कारणे देत भरपाई नाकारली.

मीना बोरवार यांनी विमा दाव्याचा प्रस्ताव सादर करताना आई, वडील, भाऊ, मुले, मुली आदींची नावे नमूद केलेली नाही. शिवाय, पक्षकार म्हणून समावेश करण्यात आलेला नाही, असे कारण विमा कंपनीने देत भरपाई नाकारली. त्यामुळे त्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत या प्रकरणात सुनावणी झाली.

विमा दाव्याची रक्कम देताना प्राधान्य शेतकऱ्याच्या पत्नीला दिले जाते. या प्रकरणात मृताच्या पत्नीने दावा दाखल केला असल्याने विमा कंपनीने घेतलेला आक्षेप निरर्थक ठरतो, असे आयोगाने निकालपत्रात नमूद केले आहे. कंपनीने मीना बोरवार यांना विमा दाव्याची रक्कम २ लाख रुपये सव्याज द्यावी, मानसिक व शारीरिक त्रासापोटी तीन हजार रुपये द्यावे, असा आदेश देण्यात आला आहे.

शेतकऱ्याचा मृत्यू त्याच्या चुकीमुळेशेतकरी संदीप बोरवार यांना फिट येण्याचा आजार होता. त्यांचा मृत्यू स्वत:च्या चुकीमुळे झाला. ही घटना विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे स्वत:हून ओढवून घेतलेली दुखापत या सदरात मोडते. त्यामुळे विमा प्रस्ताव नाकारण्यात आला. विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास जबाबदार नाही, अशी दुसरी बाजूही कंपनीने आयोगापुढे मांडली होती. परंतु, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये अपघाताच्या वेळी संदीप बोरवार याचा मृत्यू फिट येऊन पाण्यात बुडाला होता, असे कुठेही नमूद नसल्याचे मत आयोगाने नोंदविले आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळCourtन्यायालय