शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

यवतमाळची स्मशानभूमी हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 9:37 PM

शहरातील हिंंदू दफनभूमी हरविल्याने नागरिकांना अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येत आहे. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपाची नगरपरिषदेत सत्ता आहे. तर हिंदूत्वाचा नारा देणाºया शिवसेनेच्या नगराध्यक्ष येथे विराजमान आहेत.

ठळक मुद्देनगरपरिषदेचे दुर्लक्ष : मोबाईलच्या टॉर्चमध्ये अंत्यसंस्कार

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील हिंंदू दफनभूमी हरविल्याने नागरिकांना अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येत आहे. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपाची नगरपरिषदेत सत्ता आहे. तर हिंदूत्वाचा नारा देणाऱ्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष येथे विराजमान आहेत. त्यानंतरही अतिशय जिव्हाळ््याच्या व तितक्याच वेदनादायी अंत्यविधीसाठी नगरपरिषदेने कोणतीच सुविधा दिली नाही.अत्यंविधीला प्रत्येक धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. तो चांगल्या व स्वच्छ वातावरणातच पार पडला जावा, जेणे करून मृताच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी, अशी सर्वमान्य धारणा आहे. माणसाचा देह पंचतत्वात विलीन होण्याची क्रिया म्हणजे दहन अथवा दफन क्रिया होय. यवतमाळकरांच्या दुर्दैवाने या क्रियेलाच येथे ग्रहण लागले आहे. शहरातील एकमेव हिंदू दफनभूमीच नामशेष झाली आहे. पाढंरकवडा मार्गावरील हिंदू स्मशानभूमीतच दफनभूमी आहे. येथील दहन क्रियेचा परिसर थोडाबहुत सुस्थितीत असून इतरत्र पाय ठेवायलाही जागा नाही. वर्चस्वाच्या आणि श्रेयाच्या राजकारणामुळे शहराचे वाटोळे सुरू आहे. पालिकेत काही केवळ स्वत:चे हित कसे जोपासता येईल इतकाच संकूचित विचार करत आहे. कंत्राट कोणतेही असो पूर्वीचा टक्केवारीचा निकष बाजूला पडला आहे. आता भागीदारीमध्ये (जॉर्इंट व्हेंचर) कामे दिली जात आहे. याचे घोर परिणाम यवतमाळकरांना सोसावे लागत आहे. पदाधिकाऱ्यांच्या चढाओढीत प्रशासन मौजेत असून शहरातील समस्यांकडे कोणीच गांभीर्याने पाहायला तयार नाही.पांढरकवडा मार्गावरच्या दफनभूमीकडेही यातूनच दुर्लक्ष झाले आहे. कधीकाळी ही स्मशानभूमी शहराचे वैभव होती. येथील स्वच्छता व सोयी सुविधांचे नियोजन पाहाण्यासाठी इतर नगरपरिषदांच्या चमू भेट देत होत्या. आता परिस्थती पूर्णत: बदलली आहे. हिंदू दफनभूमी घनदाट झाडाझुडपात हरविली आहे. रात्री येथे दिवाबत्तीची कोणतीच सोय नाही. अक्षरश: मोबाईलचा टॉर्च लावून विधी उरकावा लागत आहे. दफन करण्यासाठी येथे इंचभरही जागा शिल्लक नाही. कधीतरी या परिसराची सफाई झाली होती. त्यानंतर येथे कोणीच फिरकले नाही. विशेष म्हणजे, लहान-थोरांच्या अंत्यविधीसाठी नगरसेवकांची, अधिकाºयांची येथे वर्दळ असते. तरीही येथील समस्यांवर दुर्लक्ष आहे.सत्ताधाऱ्यांच्या पोकळ घोषणापालिकेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे. तर नगराध्यक्ष शिवसेनेच्या आहेत. त्यांची विकासकामात आडकाठी येते ही आवई उठविल्या जाते. ही अडचणही राज्य शासनाने दूर केली असून नगराध्यक्षाला नामधारीच ठेवले आहे. त्यानंतरही निवडणूक काळात शहरवासीयांना दिलेल्या एकाही आश्वासनाची भाजपाने पूर्तता केली नाही. २४ तास स्वच्छ पाणी, गुळगुळीत रस्ते, देखणी उद्याने, घरकूल, स्वच्छ सुदंर परिसर हे सर्व दिवास्वप्नच ठरले आहे. उलट नगरपरिषदेची कार्यान्वित असलेली यंत्रण ठप्प झाली. मुलभूत सोयी सुविधाचा बोजवारा उडाला आहे. अपवाद सोडता घंटागाड्या बंद आहेत. पोकळ घोषणांचा समाचार घेण्यात विरोधकही कमी पडत आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ