शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

शिष्यवृत्ती परीक्षेची फी जिल्हा परिषद भरणार; परिषदेची विनंती मान्य, राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे ‘टार्गेट’

By अविनाश साबापुरे | Published: August 10, 2023 8:30 PM

२०१७ पर्यंत दरवर्षी राज्यातील तब्बल १५ लाख विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देत होते.

यवतमाळ : २०१७ पर्यंत दरवर्षी राज्यातील तब्बल १५ लाख विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देत होते. मात्र नंतर विद्यार्थ्यांची संख्या अचानकच कमी होऊन ती निम्म्यावर आली आहे. यावर उपाय म्हणून आता शिष्यवृत्ती परीक्षेची फी विद्यार्थ्यांनी न भरता ती जिल्हा परिषदांनी आपल्या सेस फंडातून एकत्रित भरावी, असा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला असून त्याबाबत बुधवारी सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी अवगत करण्यात आले.

इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी पूर्व उच्च प्राथमिक आणि इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी घेतली जाते. १९५४-५५ पासून सुरू झालेल्या या परीक्षेला दरवर्षी १५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बसत होते. मात्र आता ही संख्या अवघ्या सात ते आठ लाखांपर्यंत मर्यादित झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून परीक्षा परिषदेमार्फत शिक्षकांमध्ये जागृती आणून अधिकाधिक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविण्याचे प्रयत्न केले जात आहे. तरीही हा आकडा आठ लाखांवर सरकलेला नाही. त्यामुळे गोरगरीब पालकांवर पडणारा परीक्षा शुल्काचा भार कमी करण्यासाठी परीक्षा परिषदेने जिल्हा परिषदांना व महापालिकांना मे महिन्यात शुल्काचा भार उचलण्याबाबत गळ घातली होती. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन जिल्हा परिषदांनी ही फी भरण्यासाठी होकार दिला. त्याबद्दल परिषदेचे अध्यक्ष डाॅ. नंदकुमार बेडसे यांनी बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना व मनपा आयुक्तांना पत्र पाठवून आभारही मानलेत. तसेच यंदा या दोन्ही वर्गांच्या शिष्यवृत्ती रकमेतही अनुक्रमे पाच हजार आणि साडेसात हजार अशी वाढ करण्यात आली आहे. 

गेल्या सात वर्षातील परीक्षार्थी संख्या वर्ष : पाचवी : आठवी

  • २०१७ : ५,४५,९४० : ४,०३,३५९
  • २०१८ : ४,८८,८८१ : ३,७०,२४३
  • २०१९ : ५,१२,७६७ : ३,५३,३६८
  • २०२० : ५,७४,५८१ : ३,९७,५२३
  • २०२१ : ३,८८,५१५ : २,४४,३११
  • २०२२ : ४,१८,०५४ : ३,०३,८१७
  • २०२३ : ५,३२,८५७ : ३,६७,७९६

५० हजार शाळांवर ‘फोकस’परीक्षा परिषदेने २०२४ मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल ५० हजार शाळांमधील १० लाख विद्यार्थ्यांना बसविण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. पाचवीतील सहा लाख आणि आठवीतील चार लाख विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. २०२३-२४ या सत्राकरिता परिषदेने जाहीर केलेल्या अंदाजपत्रकात ही विद्यार्थी संख्या गृहित धरून परीक्षेच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्षात २०१६ मध्ये परीक्षेला बसलेल्या १५ लाख विद्यार्थी संख्येपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

का घटली विद्यार्थी संख्या?ही शिष्यवृत्ती परीक्षा १९५४-५५ पासून सुरू झाल्यानंतर ती इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात होती. २०१४ मध्ये दोन्ही वर्ग मिळून १५ लाख ६० हजार आणि २०१५ मध्ये १५ लाख ९४ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परंतु, याच सुमारास शिक्षणाचा आकृतीबंध बदलला. प्राथमिक शिक्षण चौथीऐवजी पाचवीपर्यंत झाले आणि उच्च प्राथमिक शिक्षण पाचवीऐवजी सातवीपर्यंत झाले. याबाबतचा शासननिर्णय ऐन परीक्षेच्या काळात म्हणजे १५ फेब्रुवारी २०१६ रोजी निर्गमित झाला. त्यामुळे २०१६ मध्ये परीक्षाच घेता आली नाही. तर २०१७ पासून इयत्ता पाचवी आणि आठवीकरिता पुरीक्षा घेतली जात आहे. या बदलाचा परीक्षार्थी संख्येवर परिणाम झाल्याचे अनेक शिक्षकांचे मत आहे. 

टॅग्स :YavatmalयवतमाळScholarshipशिष्यवृत्ती