"...यावरून काँग्रेस आरक्षण संपवणार हे स्पष्ट", राहुल गांधींच्या वक्तव्यावर मायावती संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 01:14 PM2024-09-10T13:14:30+5:302024-09-10T13:15:53+5:30

BSP supremo Mayawati : मायावती म्हणाल्या, खरंतर काँग्रेसची सुरुवातीपासूनच आरक्षणविरोधी विचारसरणी आहे.

Beware of their theatrics; they will never conduct caste-based census, BSP supremo Mayawati | "...यावरून काँग्रेस आरक्षण संपवणार हे स्पष्ट", राहुल गांधींच्या वक्तव्यावर मायावती संतापल्या

"...यावरून काँग्रेस आरक्षण संपवणार हे स्पष्ट", राहुल गांधींच्या वक्तव्यावर मायावती संतापल्या

BSP supremo Mayawati : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन सध्या राजकीय खळबळ उडाली आहे. भाजपच्या सर्व नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. आता बसपा प्रमुख मायावती यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रात दीर्घकाळ सत्तेत असताना काँग्रेस पक्षाच्या सरकारने ओबीसी आरक्षण लागू केले नाही. आता देशात जातीय जनगणना न करणारा हा पक्ष आता सत्तेत येण्याचे स्वप्न पाहत आहे. त्यांच्या नाटकाबद्दल जागरुक राहा, जे भविष्यात कधीही जात जनगणना करू शकणार नाहीत, असे मायावती म्हणाल्या.

आता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या या नाटकापासून सावध राहा, त्यांनी परदेशात म्हटले आहे की, जेव्हा भारताची स्थिती चांगली असेल तेव्हा आम्ही एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण संपवू. यावरून काँग्रेस वर्षानुवर्षे त्यांचे आरक्षण संपवण्याचे कारस्थान करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मायावती यांनी सांगत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या या जीवघेण्या वक्तव्यापासून या वर्गातील लोकांनी सावध राहावे, कारण हा पक्ष केंद्रात सत्तेवर येताच या विधानाच्या नावाखाली निश्चितपणे त्यांचे आरक्षण संपवेल. संविधान आणि आरक्षण वाचवण्याचे नाटक करणाऱ्या या पक्षाचे भान या लोकांना असलेच पाहिजे, असेही मायावती म्हणाल्या.

पुढे मायावती म्हणाल्या, खरंतर काँग्रेसची सुरुवातीपासूनच आरक्षणविरोधी विचारसरणी आहे. केंद्रातील त्यांच्या सरकारमध्ये त्यांचा आरक्षणाचा कोटा पूर्ण झाला नाही, तेव्हा या पक्षाकडून न्याय न मिळाल्याने बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. लोकांनी सावध राहावे. तसेच, एकंदरीत, जोपर्यंत देशातून जातिवाद पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत भारताची स्थिती तुलनेने चांगली असूनही या वर्गांची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती सुधारणार नाही. त्यामुळे जातीयवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत आरक्षणाची योग्य घटनात्मक व्यवस्था चालू ठेवणे आवश्यक असल्याचे मायावती यांनी सांगितले.

काय म्हणाले राहुल गांधी?
दरम्यान, जातिनिहाय जनगणना आणि आरक्षण या दोन मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मागच्या काही दिवसांपासून कमालीचे आक्रमक आहेत. दरम्यान, सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार? या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोठं विधान केलं आहे. जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीने समानता असेल, तेव्हाच काँग्रेस पक्ष देशामधील आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विचार करेल. सध्यातरी अशी स्थिती नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

Web Title: Beware of their theatrics; they will never conduct caste-based census, BSP supremo Mayawati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.