"राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' म्हणण्यास भाग पाडले", गुलाम नबी आझाद यांचा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 05:19 PM2022-08-29T17:19:09+5:302022-08-29T17:21:40+5:30

'2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात राहुल गांधींची 'चौकीदार चोर है' मोहिम काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना आवडली नव्हती.'

Ghulam Nabi Azad News: 'Rahul Gandhi forced to say 'Chowkidar Chor Hai'', claims Ghulam Nabi Azad | "राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' म्हणण्यास भाग पाडले", गुलाम नबी आझाद यांचा दावा...

"राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' म्हणण्यास भाग पाडले", गुलाम नबी आझाद यांचा दावा...

googlenewsNext

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आणखी एक मोठे विधान केले आहे. आझाद म्हणाले की, 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात राहुल गांधींची 'चौकीदार चोर है' मोहिम काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना आवडली नव्हती. नरेंद्र मोदींवर अशी खालच्या पातळीवरची टीका करायची नव्हती, पण राहुल यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांना हे म्हणण्यास भाग पाडले. तसेच, 2019 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजीनामा देऊन वरिष्ठ नेत्यांवर खापर फोडले, असेही आझाद म्हणाले.

'चौकीदार चोर है' म्हणण्यास भाग पाडले 
एका वाहिनीशी संवाद साधताना आझाद यांनी या गोष्टी सांगितल्या आहेत. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांना 'चौकीदार चोर है' मोहिमेला पाठिंबा देण्यास सांगितले होते. त्यावेळी मनमोहन सिंग, एके अँटनी, पी चिदंबरम आणि स्वत: आझाद यांच्यासह वरिष्ठ नेते तेथे उपस्थित होते. आझाद म्हणाले, राहुल गांधींनी आम्हा सर्वांना हे म्हणण्यास भाग पाडले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, पीव्ही नरसिंह राव यांसारख्या नेत्यांच्या काळात मुख्यमंत्री, मंत्री राहिलेले अनेक ज्येष्ठ आणि ज्येष्ठ नेते तिथे उपस्थित होते, त्यांच्याकडून जनतेसमोर अशी भाषा बोलण्याची अपेक्षा कशी करता येईल. पण, राहुल गांधी यांनीच वैयक्तिक टीका करण्यास भाग पाडल्याचा दावा आझाद यांनी केला.

इंदिरा गांधींकडून राजकारणाचे धडे
यावेळी इंदिरा गांधींचे कौतुक करताना आझाद म्हणाले, आम्हाला राजकारणाचे धडे इंदिरा गांधींकडून मिळाले. मी युवा नेत्या असताना इंदिरा गांधींनी मला फोन करून अटलबिहारी वाजपेयींना भेटत राहायला हवे असे सांगितले होते. त्या एक नेत्या आणि आजचा नेता. विरोधी पक्षाच्या नेत्यांना मान द्यायला आम्हाला शिकवले आहे. जनतेसमोर 'पीएम चोर है' अशा घोषणा द्याव्यात, असे आम्हाला कधीच शिकवले गेले नाही. पण, राहुल गांधींमुळे आम्हाला ते म्हणावं लागलं, असं आझाद म्हणाले.

Web Title: Ghulam Nabi Azad News: 'Rahul Gandhi forced to say 'Chowkidar Chor Hai'', claims Ghulam Nabi Azad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.